Sunday 2 October 2016

‘स्वच्छ भारत’ अभियानाला विद्यापीठात लक्षणीय प्रतिसाद


In front of Main Administrative Building

Vice Chancellor Dr. Devanand Shinde along with other Officers participated in cleanliness drive

Vice Chancellor Dr. Devanand Shinde along with other Officers participated in cleanliness drive

Vice Chancellor Dr. Devanand Shinde and BCUD Director Dr. D.R. More

Staff of Press

Staff of Establishment Section

Staff of Accounts Department

Staff of Zoology Department

Botany Department

Physics Department

Electronics Department

Hands at work

Environment Department

Examination Department

Ladies Staff participation

Tribute to Mahatma Gandhi and Lal Bahadur Shastri

Pledge to peace, non-violence and cleanliness

Pledge to peace, non-violence and cleanliness


कोल्हापूर, दि. २ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठात दरवर्षीप्रमाणे यंदाही राबविण्यात आलेल्या परिसर स्वच्छता अभियानाला शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, सेवक तसेच विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गतवर्षी स्वच्छता अभियानामध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीकमुक्ती करण्यात आली होती. यंदाच्या सफाईदरम्यान मात्र अत्यल्प प्लास्टीक व काचा सापडल्या, हे आजच्या उपक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. रस्त्याकडेला वाढलेली काटेरी झुडपे, गवत, परिसरात पडलेला कचरा अशा प्रकारचा कचरा आज मोठ्या प्रमाणात साफ करण्यात आला.
कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ.व्ही.एन. शिंदे, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, विद्यार्थी सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड  यांच्या मार्गदर्शनाखाली आज सकाळी साडेसात ते दहा या कालावधीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत विद्यापीठ परिसर स्वच्छता अभियान यशस्वीरित्या राबविण्यात आले.
कोणत्याही औपचारिकतेशिवाय कुलगुरू डॉ. शिंदे यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी हातात खराटे घेऊन स्वच्छतेला सुरवात केली. मुख्य प्रशासकीय इमारतीमधील प्रशासकीय सेवकांनी त्यांना नेमून दिलेल्या एनसीसी भवन गेटपर्यंतच्या परिसरामध्ये तर अधिविभागांनी आपापल्या परिसराची स्वच्छता केली. गतवर्षी राबविलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टीक कचरा व काचसामान साफ करण्यात आले होते. यंदाच्या मोहिमेदरम्यान विद्यापीठ परिसरातील प्लास्टीक व काचेच्या कचऱ्याचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे स्पष्ट झाले. स्वच्छता मोहिमेतून विद्यार्थ्यांसह नागरिकांत झालेल्या जागृतीचेच हे लक्षण आहे, असे म्हणावे लागेल.
कुलगुरू डॉ. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. मोरे, प्रभारी कुलसचिव डॉ. शिंदे व राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. गायकवाड यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीपासून ते भूगोल अधिविभागापर्यंतच्या रस्त्याची स्वच्छता केली. त्यानंतर त्यांनी परीक्षा भवनसह कॅम्पसवरील प्रत्येक अधिविभागाला प्रत्यक्ष भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. सहभागी विद्यार्थ्यांचे कुलगुरू डॉ. शिंदे यांनी मनापासून अभिनंदन व कौतुक केले.
अभियानानंतर मुख्य प्रशासकीय इमारतीच्या पोर्चमध्ये महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन केले. त्यानंतर नेहरू अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. वासंती रासम यांनी उपस्थितांना अहिंसा व शांततेची तर कुलसचिव डॉ. शिंदे यांनी स्वच्छतेची शपथ दिली. विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने सर्व उपस्थितांसाठी नाष्ता व चहापानाची सुविधा करण्यात आली.

No comments:

Post a Comment